कुऱ्हाड प्रतिनिधी (सुनिल लोहार)
शब्दांकन–दिपक पवार
“राजकारणात नेते हे कार्यकर्त्यांचा फक्त उपयोग करून घेतात व संकट आले की हात वर करतात “असा गैरसमज समाजात काही मंडळी पसरवत असतात.मात्र हा गैरसमज साफ खोटा ठरला असून आपल्या खंदया कार्यकर्त्यांच्या जीवावर आलेल्या संकटावर स्वतः नेत्यांनी प्रत्यक्ष डॉक्टरांशी संवाद साधत माझा कार्यकर्ता खूप महत्त्वाचा असून त्यासाठी चक्क मुंबईहुन यंत्रणा हालवत मुंबईच्या डॉक्टरांनी केलेल्या मार्गदर्शनातून व स्थानिक डॉक्टरांनी केलेल्या अथक प्रयत्नाने कार्यकर्ता मृत्यूच्या दारातून सुखरूप परत आला आहे.ही घटना आहे पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील रहिवाशी व अनेक दिवसांपासून राजकारणात सक्रिय असलेला नवतरुण जगदीश तेली यांची .
याबाबत घडले असे की,
गेल्या शुक्रवार २८तारखेला दुपारी जगदीश च्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली आणि जळगाव येथे नेण्याचे ठरविले परंतु वडिलांनी त्याला सांगितले, तू माझ्या सोबत येत असेल तर मी जळगावला दवाखान्यात येतो म्हणून, परंतु नियतीला मान्यच नव्हते जगदीश स्वतः चारचाकी घेऊन वडिलांना जळगाव येथे दवाखान्यात घेऊन पोहोचला तेथे डॉक्टर नसल्याने वडिलांना न दाखविता वडिलांनी त्यास सांगितले की तुझी छाती दुखत असल्याने जगदीशला दवाखान्यात दाखवण्याचे सांगितले.
तेथे उपस्थित मित्रपरिवाराच्या मदतीने त्यास ऑर्किड मल्टी स्पेशलिस्ट जळगाव येथील या खाजगी रुग्णालयात दाखल करण्याचे सांगितले,परंतु तेथे पोहचताच त्याला अटॅक चे तीन झटके आले अन् क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले ,आता जगदीश गेला म्हणून सर्व मित्र परिवार धाय मोकलून रडू लागला,कुऱ्हाड गावात बातमी पोहचली ती दुःखाची ,परंतु जगदीश एक भाजपचा सच्चा कार्यकर्ता असल्याने या ठिकाणी उपस्थित असलेले ना.गिरीश भाऊ महाजन यांचे आरोग्यदूत पितांबर भावसार व अरविंद देशमुख यांनी क्षणाचा ही विचार न करता त्याला ऑर्किड हॉस्पिटल मधील चौथ्या मजल्यावर अतिदक्षता विभागात हलविले. तेथे उपस्थित डॉक्टरांनी शेवटचा एक प्रयत्न म्हणून उपचार सुरू केले, इकडे हॉस्पिटलच्या तळमजल्यावर मित्र मंडळी,घरचा परिवार आंकात करीत होता ,हे काय झाले म्हणून सर्वांना मानसिक धक्काच बसला. परंतु मंत्री महोदय गिरीश भाऊंना घटना समजताच मुंबई येथील डॉक्टरांशी लगेच संपर्क साधला,त्यांच्याशी समूहाने फोन वर बोलत फक्त पेशंट वाचले पाहिजे मला दुसरे काही माहीत नाही,असा इशारा देत गिरीश भाऊंच्या अश्रूंची किंमत सुध्दा परमेश्वराने मान्य केली . शनिवार सकाळीच रुग्ण हालचाल करू लागल्याने सर्वचं आनंद अश्रू गाळू लागले.एका मागे एक हृदयाचे ३ तीव्र झटके येऊनही रुग्ण वाचणे हे असे लाखातून एक रुग्णाच्या बाबतीत घडते,असे मत आर्किड हॉस्पिटलचे डॉ.परेश दोशी यांनी सांगितले.आज रोजी जगदीश तेली यांची तब्बेत चांगली असून जनता जनार्दन चे आशीर्वादाने आज सुखरूप आहे .
जगदीश ने आज रोजी समाजातील गोरगरीब,वंचित घटकांना सोबत घेऊन त्यांना वेळ प्रसंगी तन मन,धनाने मदत करणे,त्यांच्या साठी अर्ध्या रात्री धावून येणे हेच पुण्य आज कामी आले, असा सूर गाव व परिसरातून निघत होता.
एकंदरीत आपण जर प्रामाणिकपणे काम केले तर आपले नेतेही आपल्यासाठी “देवदूत’बनून धावून येतात ,हा प्रत्यय या घटनेतून दिसून आला.