लोहारा ता पाचोरा–प्रतिनिधी– येथील डॉ. जे जे पंडित विद्यालयाच्या प्रांगणामध्ये कपाशी या पिकावरील किडी व रोग नियंत्रणाबाबत शेतकरी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.यावेळी राज्याचे सुप्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांची विशेष उपस्थिती होती.तसेच यूपीएल लिमिटेड कंपनीचे झोनल सेल्स मॅनेजर अजिंक्य तांदळे, झोनल मार्केटिंग मॅनेजर प्रदीप पाटील ,प्रदेश मॅनेजर पंकज पाटील,सरपंच अक्षय जैस्वाल,सतीश गवळी ,दत्तू राठोड, ज्ञानेश्वर पाटील ,कृषिभूषण विश्वासराव पाटील, ज्योती कृषी केंद्राचे संचालक महेंद्र कटारिया ,राहुल कटारिया, मुख्याध्यापक आर एस परदेशी,चिंधु चौधरी, अमृत चौधरी, सुरेश चौधरी, प्रभाकर चौधरी ,डॉ.बाळू जैन,किसन पाटील हे उपस्थित होते. यावेळी हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा विशेष सत्कार महेंद्र कटारिया व राहुल कटारिया यांनी केला.तसेच अनेक शेतकरी बांधवांनी ही त्यांचा सत्कार केला.
यावेळी अजिंक्य तांदळे यांनी यूपीएल कंपनीच्या वाटचालीबद्दल आणि शेती क्षेत्रातील अमूल्य सहभागाबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच प्रदीप पाटील यांनी कपाशी पिकाच्या व्यवस्थापन व नियोजनाबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी टिंटो, अपाचे हे नवीन उत्पादन सादर केले.
यूपीएल लिमिटेडच्या उलालाच्या कपाशी या पिकावर उद्भवणाऱ्या रस शोषण किडींच्या नियंत्रणासाठी वापर कसा करावा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा फायदा कसा होईल याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी सुप्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना हवामानाबद्दल तसेच ऋतुचक्राबद्दल मार्गदर्शन करताना पूर्वेकडून ज्यावेळी पाऊस येतो यावर्षी साधारणतः १० जून ते १५जुलै या काळात महाराष्ट्रात सार्वत्रिक पाऊस पडतो तसेच गारपीटी बद्दल आणि पावसाच्या अंदाजाबद्दल निसर्गात होणाऱ्या बदलांची माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्योती कृषी केंद्राचे संचालक महेंद्र कटारिया ,राहूल कटारिया यांचे अनमोल सहकार्य लाभले.