ना.गिरीष भाऊ महाजन वाढदिवस विशेष :–
संकलन– डॉ.केयुर धनंजयराव चौधरी
शब्दांकन:–दिपक पवार
लोहारा ता पाचोरा—(दिपक पवार)—जामनेर सारख्या अगदी लहान गावचे सरपंच ते आमदार,कॅबिनेट मंत्री व भाजपचे जिल्हाध्यक्ष ते केंद्रीय पक्ष मंडळात व पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पर्यंत पक्षात स्वतः ची अशी वेगळीच ओळख निर्माण करणारे सर्वसामान्यांचे “संकटमोचक” ठरलेले जामनेर तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांची ऊर्जा, तेज व प्रेरणास्थान असलेले असामान्य व्यक्तिमत्त्व महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण, क्रिडा युवक कल्याण मंत्री ना.गिरीष महाजन यांचा १७मे रोजी वाढदिवस…कार्यकर्त्यांसाठी एक उत्सवच…त्या निमित्ताने गिरीषभाऊंना या लेखातून शुभेच्छा देण्याचा छोटासा प्रयत्न…
गिरीष भाऊंनी राजकारण करत असताना सामाजिक बांधिलकी जोपासत सर्वसामान्य जनतेच्या मदतीला नेहमीच धावून जाण्याच्या स्वभावाने अतिशय मोठं काम वैद्यकीय सेवेत केले आहे.मग ते कार्य फक्त मतदार संघात मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे.मग लातूर ,किल्लारी येथील भूकंप ग्रस्तांना मदत,केरळ येथे अति वादळाने झालेले नुकसान व त्यावेळी केलेली वैद्यकीय मदत व स्वतः केरळमध्ये आपत्ती ग्रस्तांसाठी धावून जाण्याची माणुसकी आजही स्मरणात राहील अशी आहे.
त्यामुळे भाऊ खरे “संकट मोचक”ठरले आहेत. राजकीय जीवनात व सरकार मध्ये काही संकट उभे ठाकल्यास सरकार गिरीष भाऊंकडे जबाबदारी सोपविण्यात येते नि भाऊ ती जबाबदारी अगदी सहज पार पाडत समस्या सोडवत सरकारची बाजू मांडत मार्ग काढत असतात..हे अनेक घटनांवरून दिसून आले आहे.
भाऊंनी जनतेच्या वैद्यकीय सेवेचा वसा घेतला असून त्यातूनच संपूर्ण महाराष्ट्रात सर्वप्रथम जळगाव मध्ये ‘मेडिकल हब”ची घोषणा केली व आज रोजी जळगाव विमानतळासमोर ७११कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देत मेडिकल हब चे अगदी मोठ्या जोमात सुरु आहे.२०२४ पावेतो काम पूर्णत्वास येणार असून जनतेला सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा ज्या पुणे,मुंबई येथे जाऊन घ्याव्या लागतात त्या जळगाव मध्ये सहज उपलब्ध होणार आहेत, त्यासाठी गिरीष भाऊंची दूरदृष्टी ही मानावी लागेल..त्यामुळे भाऊंना”संकट मोचक”ही जनतेने दिलेली पदवी खरोखरच योग्य असल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे.
#माझे_दैवत_भाऊ Girish Mahajan
आईच्या नात्याप्रमाणे वासल्य देणार आपला सर्वांचा #बापमाणुस#कुठलीही राजकीय अभिलाषा न बाळगणारा,लोकहितासाठी कायपण/समस्त जामनेर तालुक्यातील लोकांच्या मनाचा राजा,सडेतोड विचाराचे आपले भाऊ प्रत्येकाच्या मनामध्ये, हृदयामध्ये अढळ स्थान करून आहेत.प्रत्येकाचे हित हे माझे हित मानत मतदार संघा सह महाराष्ट्रातील प्रत्येकाचे काम पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करणारे आपले भाऊ.प्रत्येकाला अभिमानाने सांगावेसे वाटते की प्रत्येक नात्याला आईच्या नात्याप्रमाणे वासल्य देणारा हा आपला #बापमाणुस# म्हणजे आपले भाऊ. आपल्या कामातून प्रत्येक आचारांचं आणि विचारांचं गारुड घालणारा हा गारुडी गेली ३५ वर्षा पासून आपल्या सेवेसाठी सामाजिक कार्यकर्ता, सरपंच,आमदार, मंत्री , आरोग्य दुत आणि इतर पद भूषवत आपल्या सर्वांच्या सेवेसाठी अहोरात्र तारा बनून आपल्यासाठी झटतोय.मग ते करताना आपला स्वतःचा विचार न करता आपल्या सर्वांसाठी ध्यान ऋषी बनून प्रत्येक घटकाच्या विकासासाठी प्रत्येक प्रयत्न सफल करतोय.खरच बोलायला गेलं तर खूप आहे कारण भाऊंच्या काही विकास कामाच्या क्षणांचे साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले आहे.भाऊंसाठी मी नेहमी हेच बोलेन की भाऊ तुमचा प्रत्येक शब्द/विचार आचार/निर्णय/बोलणे फक्त कायम मी निशब्द होऊन साक्षीदार होतोय म्हणजेच सगळंच कस शब्दांच्या पलीकडचं आहे.शेवटी एकच भाऊ आज मात्र माझ्या उराशी आणि हृदयात सामावून उद्या नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या समोर निशब्द होऊन उभा असेन…
“झाले बहु, होतील बहु, परंतु या सम हा”
ज्यांच्या कर्तृत्वाचं वर्णन करतांना अनंत शब्दही कमी पडतील अशी ज्यांची ख्याती… अगदी थोडक्यात सांगायचं म्हंटल तर भाऊं सारखं नेतृत्व पुन्हा होणे नाही! जिथे सर्वांच्या कल्पना, विचार संपतात तिथून भाऊंचे विचार सूरु होतात… म्हणूनच प्रत्येक जबाबदारी ते यशस्वीरीत्या पार पाडतात,किंबहूना यश त्यांच्या मागेच धावत असतं.सर्व सामान्यांना आपलेसे वाटणारऱ्या भाऊंना वाढदिवसाच्या शुभकामना….!👏🏻
*झरा अखंड वाहतो जिथे दातृत्वाचा…*
*वाढदिवस एका असामान्य नेतृत्वाचा!!
–—डॉ.केयुर धनंजयराव चौधरी…