जय ज्योती ,जय क्रांती ,जय सावता
सत्य परेशान हो सकता है, पर पराजित नही
३८ वर्ष जुना असलेला सर्वात पहिला महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या प्रदेश अध्यक्षपदी अनिल भाऊ महाजनच पुणे येथील
धर्मादाय आयुक्त न्यायालयाचा निर्णय
अनिल महाजन यांच्यासह १० विश्वस्तांचा चेंज रिपोर्ट अधिकृत मंजूर
जळगांव—प्रतिनिधी–माळी समाजाची ३८ वर्ष सर्वात जुनी आणि अधिकृत संघटना ही महाराष्ट्र माळी समाज महासंघ आहे. १९८३ पासून हा महासंघ माळी समाजाच्या सामाजिक कार्यासाठी अस्तित्वात आहे. माळी समाजातील यशस्वी अनेक मान्यवरांना या महासंघात काम करण्याची संधी मिळाली आहे.
दिनांक १८/१०/२०१८ रोजी नाशिक येथे लोकशाही पद्धतीने निवडणूक होऊन महाराष्ट्र माळी समाज महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली होती. संस्थेच्या सर्व अधिकृत सभासदांनी एकत्र येऊन एकूण ११ लोकांची विश्वस्त म्हणून निवड केली व नवीन विश्वस्त कार्यकारी मंडळ स्थापन करण्यात आले.
अनिल महाजन, हरिश्चंद्र डोके, आर.बी.माळी, प्रवीण महाजन, अशोक भुजबळ, दीपक महाजन, शोभा रासकर, पौर्णिमा महाजन ,डॉ.विना कावलकर, अजय गायकवाड, काशिनाथ जाधव. विश्वस्त पदी निवड केली होती व सर्व नवनियुक्त विश्वस्त यांनी मिळून प्रदेश अध्यक्ष पदी अनिल महाजन यांची निवड केली आहे. त्याचा अधिकृत चेंज रिपोर्ट दिनांक २७/११/२०१८ रोजी पुणे धर्मादाय आयुक्त यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आला होता.*
मागील विश्वस्त बॉडी मधील माधवराव हुडेकर ,विजयराव बोरावके,भानुदास राऊत व यांच्यासोबत अजून काही वयस्कर व खोचट मंडळींनी चुकीच्या व नेहमी समाजात संभ्रम निर्माण करणारा समाजाला वेठीस धरणारा समाजाच्या नावावर आपली स्वतःची दुकानदारी चालवणारा अज्ञान व्यक्तीचे ऐकून या मंडळींनी चेंज रिपोर्टवर लेखी हरकत घेतली होती. अनिल महाजन व नवीन विश्वस्त यांची निवड बेकायदेशीर आहे असा आरोप या लोकांनी केला होता. त्याचे कारण हे होते की, महाराष्ट्र माळी समाज महासंघाकडून काम न करणाऱ्या व रीतसर मुदत संपलेल्या या जुन्या लोकांना सभासदांच्या मागणी वरून मागील विश्वस्तांना सर्व पदावरून कमी करण्यात आले आहे. त्याचा राग मनात धरून व खुर्चीला चिकटूनच राहायचे नवीन लोकांना संधी दयाची नाही ही वृत्ती मनात ठेवून काम करणाऱ्या ह्या खोचट वयस्कर मंडळींनी बदल अर्ज मंजूर करण्यात येऊ नये म्हणून हरकत घेतली होती.पण कितीही हरकत घेतल्या खोटे-नाटे आरोप केले समाजात संभ्रम निर्माण केले तरी सत्य हे कधीच लपत नसते.
*मागील पाच वर्षांपासून आपला काम धंदा व्यवसाय सोडून पायाला भिंगरी बांधून स्वतःचा पैसा, वेळ खर्च करून महाराष्ट्रभर माळी समाज एकत्र करण्यासाठी फिरणारे अनिलभाऊ महाजन यांच्या कार्याची दखल अखेर पुणे धर्मादाय न्यायालयाने घेतली.दिनांक १८/१०/२०१८ रोजी झालेले नाशिक येथील वार्षिक सर्व साधारण सभेचे इतिवृत्त व पुरावे बघितले. आतापर्यंत अनिल महाजन यांनी केलेल्या कामाचे स्वरुप बघितले. सर्व कायदेशीर नियमानुसार रेकॉर्ड आढळून आले समोरील हरकतदाराचे म्हणणे ही कोर्टाने ऐकून घेतले. तब्बल अडीच वर्षे धर्मादाय आयुक्त पुणे यांच्या न्यायालयात सदर चेंज रिपोर्ट ( बदल अर्जा बाबत ) खटला चालला. हरकतदारांचे हे कुठल्याही प्रकारे ठोस पुरावे देऊ शकले नाही. महासंघासाठी हरकतदारांचे कुठलेही ठोस कार्य दिसून आले नाही. त्यामुळे पुणे धर्मादाय आयुक्त न्यायालयाच्या श्री. राहुल चव्हाण साहेब यांच्या बँचने हरकतदारांचा अर्ज फेटाळला व अनिल महाजन यांच्यासह एकूण विश्वस्त असलेले १० लोकांचा बदल अर्ज गुणवत्तेच्या आधारावर मेरिट वर मंजूर करण्यात आला.धर्मादाय आयुक्त पुणे न्यायालयाचा आदेश श्री. राहुल चव्हाण साहेब यांच्या सहीनिशी दिनांक ०१/०४/२०२१ एप्रिल रोजी पारित करण्यात आला आहे.*
अनिल महाजन यांच्या तर्फे ॲड. डी.डी शहा यांनी काम पाहिले.
तर हरकतदार यांच्यातर्फे ॲड श्री.टिळेकर यांनी काम पाहिले.
गेल्या अडीच वर्षापासून समाजात संभ्रम निर्माण करणाऱ्या व महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या नावाने वधू-वर मेळावे घेऊन समाजातून पैसे जमा करणाऱ्या तसेच आम्हीच महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे विश्वस्त / अध्यक्ष आहे असे भासवणाऱ्या लोकांना पुणे धर्मादाय आयुक्त न्यायालयाने दणका दिला आहे.या लोकांचा महाराष्ट्र माळी समाज महासंघाशी काहीही संबंध राहिलेला नाही. त्यामुळे समाजातील लोकांनी त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये. हे लबाड, ढोंगी आहेत समाजाचा वापर करून दुकानदारी करणाऱ्यांना आता समाजानेच धडा शिकवावा माळी समाजातील तरुणांनी ह्या लोकांच्या भूलथापांना बळी पडू नये.
महाराष्ट्र माळी समाज महासंघाची स्थापना १९८३ साली खान्देशात धुळे येथे झाली. चंद्रकांत पांढरे सर यांनी समाजाच्या हितासाठी महाराष्ट्र माळी समाज महासंघाची स्थापना केली. परंतु अनेक वर्षांपासून पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांचा ताबा या संस्थेवर आतापर्यन्त राहिलेला होता. राज्यभरात संभ्रम निर्माण झाला होता की, महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे २ गट आहेत अशा चर्चा नेहमी होत होत्या. आज त्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.