लोहारा ता.प्रतिनिधी—
येथून जवळच असलेल्या नांद्रा प्र लो ता. जामनेर येथे श्रीराम नवमी निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने रक्तदान शिबिराचे अत्यंत गरज होती.त्यामुळे दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा तरुणांनी मोठा उत्साह दाखवून कोरोनाची भीती न बाळगता स्वेच्छेने रक्तदान केले. यावेळेस गावातील तरुणांना रक्तदानाचे महत्त्व माणुसकी रुग्णसेवा समूहाचे जिल्हाध्यक्ष समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनी पटवून दिले, व स्वतः मी पंचवीस वेळा रक्तदान केले आहे असे सांगितले. नांद्रे येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ आधार पाटील यांनी देखील शिबिराच्या एकदिवस अगोदर गावातील तरुणांशी संपर्क साधून रक्तदान विषयी माहिती विषद केली, यावेळेस गावातील ३२ रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले. यामध्ये डॉ. हर्षल पाटील,सुनील पाटील,दीपक पाटील,नामदेव पाटील,नरेंद्र सोनवणे,कपिल पाटील,धीरज पाटील, ऋषिकेश तायडे,हरदास पाटील,राकेश गुजर,स्वप्नील पाटील,रुपेश पाटील,सागर पाटील,हितेश पाटील,विश्वजीत गुजर, विशाल पाटील,योगेश पाटील,एकनाथ शिंदे,सचिन पाटील,शुभम पाटील,भारत कोळी,मनोज पाटील, शशिकांत पाटील,मधुकर पाटील,द्वारकेश तायडे, यांनी रक्तदान केले. रक्त संकलनासाठी रेड प्लस ब्लड बँक जळगाव डॉ.भरत गायकवाड, अमोल पाटील, प्रकाश सपकाळ, अमोल शेलार यांचे सहकार्य लाभले. रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी ईश्वर चोरडिया, माणुसकी रुग्णसेवा समूहाचे जिल्हा अध्यक्ष गजानन क्षीरसागर,सरपंच व सामाजिक कार्यकर्ते डॉ आधार पाटील,कांतीलाल पाटील. ग्रामपंचायत सदस्य, माणुसकी ग्रुपचे सदस्य यांनी परिश्रम घेतले.