प्रतिनिधी |
लोहारा ता पाचोरा—प्रतिनिधी–– येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लोहारा-शेंदुर्णी ही सोईची व अत्यावश्यक असणारी बससेवा शालेय वेळेत तात्काळ सुरु करावी व जळगांव हुन लोहारा परतीच्या प्रवासासाठी सायंकाळी ५ वाजता बससेवा सुरू करावी,अशा मागणीचे निवेदन माहिती अधिकार कार्यकर्ते शांताराम बेलदार यांनी विभाग नियंत्रक जळगांव, परिवहन महामंडळ यांना दिले आहे.व तात्काळ दखल न घेतल्यास १५ ऑगस्ट पासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
शेंदुर्णी महाविद्यालयात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बससेवा उपलब्ध नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे व शासनाच्या अहिल्यादेवी होळकर मोफत प्रवास योजनेपासून विद्यार्थीनिंना वंचित राहावे लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.तर लोहारा येथून जळगांव ला जाण्यासाठी सकाळी बस आहे मात्र जळगांव हुन लोहारा परतण्यासाठी बस नसल्याने ही बस सुरू झाल्यास प्रवासी ,ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधवांना फायदेशीर ठरणार आहे.तरी लोहारा-शेंदुर्णी व जळगांव-लोहारा बससेवा तात्काळ सुरू कराव्यात अशी मागणी शांताराम बेलदार यांनी केली आहे .अन्यथा दखल न घेतल्यास १५ऑगस्ट पासून आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.